सतत पाच वर्षे मराठवाडा तीव्र दुष्काळाला सामोरा जातो आहे . प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा कोणता ना कोणता कोपरा-कंगोरा यात होरपळतो आहे . मग ती तरुणाची इच्छा असो , जनावरांबद्दलची माया असो किंवा पतीचं निधन असो ;हे दुःख लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत मराठवाडा सहन करतो आहे . यासारखीच परिस्थिती देशात इतरत्र असणार .
ती दुःख व्यक्त करण्याचा ‘दुष्काळ ‘ हा एक प्रयत्न .

Trupta (तृप्ता)
आपल्या देहाचे सामर्थ्य आणि मर्यादा यांचे भान ठेवून ...
भावना आणि विचारांचा समतोल साधत केलेला व्यक्तिमत्वाचा विकास ...
म्हणजेच आयुष्याचा अन्वयार्थ शोधण्यासाठी केलेला प्रवास.
तृप्ता हा प्रवास करते आहे ..
"आकाश"च्या सावलीत, "जीत"च्या प्रेमाचा आधार घेऊन ..
मराठवाडयात नेहमी दुष्काळ असतो . त्या दुष्काळामुळे होणारी त्या भागातील लोकांची ,जनावरांची अवस्था या पुस्तकात वर्णन केली आहे.
रेखा बैजल यांचे “दुष्काळ” हे पुस्तक खरंच सर्वानी वाचण्याजोगे आहे .
मराठवाडा हा नेहमी दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. तसेच त्यामुळे येणारे संकट हे वेगवेगळ्या प्रकारचे असते. हे ” दुष्काळ ” या कथेत खूप छान वर्णन आहे.